Sunday, December 20, 2015

पैन्ग्बरवासी उस्ताद बडे गुलाम आली खान 

पै उस्ताद बडे गुलाम अली खान ऐक वेगळेच रसायन होते!! मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती अशी नोंद आहे!!
मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमर्या गाऊन वेळ मारून नेत अशी पण नोंद आहे!!
कै जी ऐन जोशी ऐक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खांसाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले!! असे अवलिया कलाकार होते!!
अवलिया असल्याची आणखीन ऐक आठवण. त्यांचा उत्तर कर्नाटकात कोठे तरी ऐका छोट्या गावात मैफल ठरली!! संध्याकाळी मैफलीच्या ठिकाणी ते आणि त्यांचे साथीदार पोचले पण ती वेळ त्यांची नव्हती आणि मैफिलीत गाणे बिलकुल रंगले नाही साधारण रात्री १ वाजता त्यांनी रसिकांची माफी मागून मैफल आवरली आणि ते साथीदार आणि जमलेले रसिक रेल्वे स्टेशनात आहे जमलेले बहुतेक सर्व रसिक त्यांना निरोप देण्यास जमले होते. स्टेशनवर आल्या नंतर त्यांना गायची इच्छा झाली आणि गाडीची वेळ होई पर्यंत ते तेथील रसिकांना तेथेच गाणे ऐकवले!!
मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खांसाहेब जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गायला जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा त्यांना गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन सांगितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले!! जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला ) तो बहोत खुबसुरत है!!
एकदा देवधर मास्तर आणि खांसाहेब मुंबईत रस्त्यावर फिरत होते आणि तेव्हा त्या दोघांना ऐक नखरेल तरुणी दिसली तिच्याकडे बघून त्यांची तबियत एकदम खुश झाली आणि म्हणाले चल तुमच्या विद्यालयात चला तुम्हाला ऐक ठुमरी ऐकवतो आणि नंतर त्यांनी अशी काय रसिली ठुमरी ऐकवली कि त्याची आठवण आयुष्यभर राहावी अशी आठवण देवधर मास्तर लिहितात!! तसेच मुंबईत पावसाळ्यात marine drive येथे जसे पावसाचे पाणी ज्यावेगाने वर उसळी मारत होते त्याच वेगात ते मल्हार रागाच्या ताना घेत होते अशी आठवण पण देवधर मास्तर लिहितात
लाहोर येथे जन्मलेले खांसाहेब फाळणीनंतर तेथेच राहिले पण पाकिस्तानात जेवढा गझल गायकाला जेवढा मान मिळतो तेवढा मान शास्त्रीय आणि घराणेदार गायकाला मिळत नाही याची त्यांना खंत होती. काही वर्ष ६ महिने हिंदुस्थान आणि ६ महिने पाकिस्तानात राहत. त्यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कै मुरारजी देसाई यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. मुरारजी देसाई यांनी रसिकांवर मोठे उपकार केले आणि खांसाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले
ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता!! तसेच हरी ओम तत्सत सारखे भजन पण नेहेमी गात असत. आपण जेव्हा त्यांनी गायलेले हे भजन ऐकल तेव्हा धर्माच्या रेषा कश्या नाहीशा होतात याची अनुभूती होईल!!
गानसरस्वती लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या आणि १९५६ साली कोलकाता येथे ऐका संगीत समारंभात त्यांनी स्वरसाथ केली आहे आणि साथ करताना ऐक तान अशी काय घेतली कि खांसाहेबांनी तेथेच शाबासकी दिली अशी नोंद आहे!!
आंतरजाळावर त्यांची काही जुनी ध्वनीमुद्रणे वरचेवर येत आहेत हे रसिकांचे भाग्याच आहे!!
वरील ध्वनिफितीमध्ये १९५० च्या सुरुवातीला राग मारवा गायला आहे. आवाजाची प्रत (Sound Quality) फार उत्तम नाही आहे पण काय गात आहेत याची प्रचीती नक्कीच येते.
आणखीन काय लिहू!! मारवा ऐकताना ज्या वाचलेल्या आठवणी मनात येत गेल्या त्या येथे लिहिल्या आहेत!! या संगीत साधकास माझे दंडवत

No comments:

Post a Comment