Saturday, December 19, 2015

कट्यार चित्रपटातील गाणी 


कट्यारची गाणी दोन तीन वेळा ऐकून मी प्रतिक्रिया लिहित आहे
१. सूर निरागस गाणे ठीक आहे पण चाल पण ठीक आहे पण बुवांच्या चालीची सर नाही!!
२. भोला भंडारी चाल ठीक आहे पण गायकाची नवड चुकीची वाटली त्यामुळे गाणे पडले

३. दिन गेले भजनाविण कट्यार मधील गाणे कुठे भार्गमराव आचरेकर यांची दमदार गायकी आणि शंकरने गायलेले गाणे हे अगदीच आत्मा नसलेले वाटले!! 
४. शंकरने गायलेले घेई छंद मकरंद चांगले आहे
५. लागी करेजवा काटार हि ठुमरी अंगाचे गीत गाणारे आज समर्थ गायक असताना बुवांची ध्वनिमुद्रिका का वापरली हे कळत नाही!! आजच्या गायाकापैकी अभिषेकी बुवांचे कित्येक शिष्य हे गाणे नक्कीच बुवांचा आब ठेवून म्हणून शकले असते!!
६. मन मंदिरा गाणे ठीक आहे पण शंकर रेषांनी या शब्दाचा उच्चार करताना चुकला आहे!!
७. मुरलीधर श्याम परत तेच मुल प्रसाद सावकार यांचे गाणे कुठे आणि हे गायलेले पातळ आमटी सारखे वाटले!!
८. सुरे से सजी गाणे ठीक आहे
९. तेजोनिधी लोह गोल एकट्या राहुलने गायले असते जास्त चांगले असते कारण त्यातील जो आक्रमक गायकीचा अविष्कार शंकरच्या गायकीला विपरीत आहे!! परत वसुधेची लाज राख हि ओळ गाताना उच्चार काही व्यवस्थित झाले नाही!!
बाकी राहुलने गायलेली गाणी चांगली आहेत आपल्या आजोबांच्या गायकाची व्यवस्थित आब राखली आहे!!
मूळ नाटकातील माझे सर्वात आवडते गीत या भवनातील गीत पुराणे या चित्रपटात आहे असे वाटले नाही!!
शंकरची गाणी मर्यादित ठेवीन राहुलची वाढवली असती तर जास्त चांगला झाला असत असे मळता वाटते!! शेवटी कट्यार म्हणजे वसंतराव त्यांची जेवढी या नाटकावर छाप होती तेवढी अन्य गायक कलाकाराची नव्हती!!

तसेच नाकात गाणे हे शंकरच्या गाण्यातील मोठे वैगुण्य आहे ते येथे आड नाक्कीच्व्ह येत आहे!!
नाट्यसंगीत गाताना रस्व आणि दीर्घ याचे उच्चार वेगळे असतात असे वसंतराव म्हणत असत ती गोष्ट येथे काही फारशी जाणवली नाही!!

उत्तम प्रयत्न पण अपेक्षा वाढवून निराशा करणारा!!

No comments:

Post a Comment