Saturday, December 19, 2015

संगीतकार रोशन

जेव्हा हिंदी चित्रपटातील अभिजात संगीताचा विषय येतो तेव्हा ऐक नाव न टाळता येण्यासारखे आहे ते संगीतकार रोशन यांचे आहे!!

रोशन यांचे पूर्ण नाव रोशनलाल नागार्थ त्यांचा जन्म १४ जुलै १९१७ साली पंजाबमधील गुजरान्वाला येते झाला लहानवयापासून त्यांना संगीताची आवड होती आणि ते ऐकताना तहानभूक विसरत असे घरचे सांगत!! गाण्याच्या वेडापायी ते घरातून पळून महियर येथे महान संगीत साधक उस्ताद अल्लाउद्दिन खान (पंडित रविशंकर, उस्ताद आली अकबर खान, पंडित निखिल बनर्जी आणि इतर कित्येक महान कलाकारांचे गुरु) यांच्याकडे आले आणि संगीत शिकवण्याची विनंती केली. उस्तादांनी त्यांच्या अवताराकडे पाहून प्रत्यक्ष संगीत शिकवायला नकार दिला पण म्हणाले माझ्या घरी रहा आणि ऐकून ऐकून जेवढे शिकता येईल तेवढे शिक.. उस्तादांचे घर म्हणे ऐक संगीताचे विद्यापीठ होते तेथील सांगतिक वातावरणाचा रोशन यांना निश्चित फायदा झाला.. त्यांचे पुढील शिक्षण मौरीस कौलेज (भातखंडे विद्यापीठ) लखनौ येथे झाले. तेथे श्रीकृष्ण उर्फ अण्णासाहेब रातान्जंकर हे विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर गुरुजनांकडून रोशन यांना व्यवस्थित संगीताचे शिक्षण मिळाले. इसराज या वाद्यावर चांगले प्राविण्य त्यांनी मिळवले.. येथील शिक्षणामुळे त्यांना रेडियोवर नोकरी मिळाली आणि इरा नामक रेडियोवर गायला येणाऱ्या गायिके बरोबर त्यांचे लग्न झाले. तेव्हाच योगायोगाने त्यांची गाठ केदार (काही ठिकाणी किदार असा उल्लेख आहे) शर्मा यांची गाठभेट झाली आणि शर्मा यांनी त्यांना मुंबईत येउन चित्रपट संगीत देण्याचा प्रस्ताव मांडला पण रोशन यांनी तो काही स्वीकारला नाही कारण त्यांना मनापासून शास्त्रीय संगीताची सेवा करायची होती. पण पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी मुंबईला येण्याचे ठरवले आणि मुंबईत आल्यानंतर पहिला ब्रेक केदार शर्मा यांनीच दिला चित्रपटाचे नाव होते नेकी और बदी (१९४९). या चित्रपटाबरोबर त्यांना आणखीन ३ असे एकंदर पहिल्या फटक्यात चार चित्रपट मिळाले. हे चित्रपट पडले आणि रोशन यांनी निर्णय घेतला जर अभिजात संगीत चित्रपटांना द्यायचे असल्यास एकावेळी एवढे चित्रपट एकावेळी घ्यायचे नाहीत!! त्यातील बावरे नैन (१९५०) या राज कपूर आणि गीता बाली अभिनित चित्रपटातील दोन गाणी त्याकाळी गाजली ऐक होते राजकुमारी यांनी गायलेले सून बैरी बलम साच बोल रे आणि मुकेश यांनी गायलेले तेरी दुनिया मी दिल लागता नाही!! पुढील यश मिळवण्यास त्यांना ७ वर्ष वात पाहायला लागली आणि मधला काळात नौबहार चित्रपटात ऐका मीराबाईच्या भजनाला त्यांनी ऐक अभिजात चाल दिली https://www.youtube.com/watch?v=s11ZXJ_bopg. हि चाल त्यांनी राग भीमपलास मध्ये बांधली !!

पुढेचे यश त्यांना आजी बस शुक्रिया (१९५८) या चित्रपटाला मिळाले यातील सर्व गाणी त्याकाळात गाजली आणि सर्वात गाजलेले गाणे होते सारी सारी रात तेरी  याद सताये https://www.youtube.com/watch?v=tQaLUtuI8Xw

१९६० साल आले आणि रोशन यांनी मागे वळून बघितले नाही यानंतरचे बहुतेक चित्रपट यशवी ठरले आणि गाणी अगदी सुपरहिट ठरली!! अर्थात गाणी सुपरहिट होण्याकरता रोशन यांनी कसलीही तडजोड केली नाही!!

बाबर (१९६०) साली आलेल्या चित्रपटात सुधा मल्होत्रा यांनी गायलेले राग यमन वर आधारित सलामे हसरत काबुल  करलो https://www.youtube.com/watch?v=QbkgYYt6w40. या गाण्यात पंडित राम नारायण यांनी वाजवलेली सारंगी तेवढीच उठावदार आहे !!

नंतर आलेला बरसात कि रात (१९६०) या चित्रपटातील सर्व गाणी गाजली आणि आजही गायली जातात!!

या नंतर एकेके हिट चित्रपटांची आणि गाण्याची मालिका सुरु झाली
आरती (१९६२), वल्लह क्या बात ही (१९६२), दिल हि तो ही (१९६३), ताज महाल (१९६३), चित्रलेखा (१९६४), दूज का चांद (१९६४), भिगी रात (१९६५), नई उमर की नई फसल (१९६५), देवर (१९६६), ममता (१९६६) आणि शेवटी आलेला अनोखी रात (१९६८). त्या खेरीज ऐक दुर्लक्षित चित्रपट आहे तो नूरजहान (१९६७)

माझ्या मते लोकगीत, गझल, कव्वाली या सर्व गान्प्रकारांवर रोशन यांचे प्राविण्य फार उत्तम होते. कै संगीतकार मदन मोहन हे गझलसम्राट म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी रोशन यांनी त्याच तोडीच्या गझल दिल्या आहेत त्याचे ऐकच उदाहरण पुरेसे आहे.. ममता (१९६६) या चित्रपटात राग तिलंग वर आधारित असलेली गझल रहते थे कभी हम जिंके दिल मे https://www.youtube.com/watch?v=tMiLndLz9hY. .

उत्तम कव्वाली बांध्याची दोन उदाहरणे आहेत ऐक बरसातकी रात मधील राग कलावती वर आधारित न तो कार्व कि तलाश है https://www.youtube.com/watch?v=wP-k7QlB1jQ आणि दुसरी आहे दिल हि तो है मधील यमन रागावर आधारित निगहेन मिलाने को जी चाहता है https://www.youtube.com/watch?v=K5SM4D515Jc

लोकसंगीतावर आधारित ऐक अभिजात गाणे आहे विकल मोरा मनवा सुरुवातील भाग लोकसंगीत आहे!! https://www.youtube.com/watch?v=E_4cnl-M1dY (चित्रपट ममता)

याच चित्रपटातील यमन रागावर आधारित ऐक युगलगीत आहे छुपा लो युन दिल मी प्यार https://www.youtube.com/watch?v=wstxx7H_9fs. ऐक शांत रसातील ऐक उत्तम प्रेमगीत आहे!! यात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी वाजवलेली बासरी तेवढीच परिणामकारक आहे!!

मदनमोहन हे महान संगीतकार होते यावर कसलेच दुमत नाही पण रोशन पण तेवढेच महान होते आणि त्यांना जेवढे  नावाजायला पाहिजे होते तेवढे नावाजले गेले नाही असे माझे प्रामाणिक मत आहे!!

रोशन यांनी बांधलेल्या गीतात ऐक सर्वात चांगले गीत निवडायचे असल्यास कुठले निवडावे रहे न रहे हम, छुपा लो युन दिल मी प्यार मेरा आणि मन रे तू कहे न धीर धरे या तीन गाण्यात कुठले निवडावे याचा निर्णय घेता येत नव्हता पण माझ्या घरी मुलीचा जन्म झाल्यानंतर मला याचे उत्तर मिळाले आणि आज रोशन यांचे माझ्या मते सर्वोत्तम गीत निवाड्याचे असल्यास मी मेहेलोनका राजा मिल हे गीत निवडेन https://www.youtube.com/watch?v=9H6m056i-tU

रोशन हे मनाने एक संत होते!! १९६० च्या दशकात एकदा राज कपूर आणि शंकर जयकिशन यांच्यात मोठे भांडण झाले आणि राज कपूर यांनी संगीत देण्यास रोशन यांना पाचारण केले. राज कपूरचे चित्रपट म्हणजे पैसे कमावण्याची आणि प्रसिद्धीची मोठी संधी होती पण संत व्यक्तिमत्वाचे रोशन यांनी राज कपूर आणि शंकर जयकिशन यांच्यात परत सुखसंवाद घडवून आणला आणि शंकर जयकिशन यांनी चित्रपटाला संगीत दिले. त्यांचे समकालीन संगीतकारांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांनी कोणाचीही निंदा कधीच केली नाही!!


रोशन यांचा मृत्यू नोव्हेंबर १६, १९६७ या दिवशी ऐका फिल्मी पार्टीत गेले असता कोणी तरी ऐक विनोद सांगितला त्यावर रोशन हसले आणि हसत असताना छातीत काळ येउन ऐका क्षणात मृत्यू आला!! वय होते फक्त ५०. अवघे १८ वर्ष चित्रपट सृष्टीत त्यांनी काम केले आणि मोठा वारसा मागे ठेवला आहे!! जरी चित्रपट सृष्टीत कार्यरत असले तरी त्यांनी स्वतःची तुतारी कधीच वाजवली नाही आणि सवंग प्रसिद्धीचा मागे कधीच लागले नाही!! थोडेसे अंतर्मुखी व्यक्तिमत्व असलेले रोशन यांना खरेतर शास्त्रीय संगीताची सेवा करायची होती ती त्यांना कधीच करता आली नाही याची खंत कायम त्यांच्या मनात होती आणि ती खंत उराशी बाळगत त्यांच्या अंत झाला!! 

No comments:

Post a Comment