मावळत्या दिनकरा हे गीत माझे तसेच माझ्या आई वडिलांचे आवडते गीत आहे हे गीत मी अगदी बालवयापासून ऐकत आहे जेव्हा शब्दाचा अर्थ काळात नसतो त्याकाळात फक्त एकच गोष्ट माझ्या लक्षात राहिली आहे जेव्हा लतादीदी सुरुवातील मावळत्या जे शब्द गाताना जो आर्त भाव व्यक्त करतात तोच माझ्या कायम लक्षात राहिला आहे.
या काव्यावर / गीतवर तसेच भास्करराव तांबे यांच्यापासून सुरेश भट यांच्यासारख्या प्रतिभावान कवींच्या कविता सुधीर फडके यांच्या पासून श्रीधर फडके यांच्यापर्यंत विविध संगीतकार मंडळीनी गाण्यात रुपांतर केले आहे ती गाणी जोवर मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत ऐकली जातील (इंग्रजी भाषेतील Dunkirk वरील वाक्याचा वापर करायचा मोह मला आवरला नाही)
जो भाव मला मावळता दिनकर मध्ये सापडला तोच भाव मला सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या शब्द शब्द जपून ठेव या कवितेत / गीतात. मंगेश पाडगावकर यंच्या शब्दांना कै विश्वनाथ मोरे यांनी अतिशय उत्कृष्ट चाल दिली आहे. तच आर्त भाव गणाच्या सुरुवातील वाजवलेल्या बासरीत पण मिळेल!! हेच गीत एकदा सुरेश वाडकर यांनी ETV वरील ऐका कार्यक्रमात तितक्याच ताकदीने पेश केले होते
अगदी तसाच भाव सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ऐका अप्रसिद्ध अभंगात पण सापडला. अभंगाचे शब्द आहेत मायेंविण बाळ क्षणभरी न राहे तुकोबांच्या शब्दांना कमलाकर भागवत यांनी जबरदस्त चाल दिली आहे!!
तोच आर्त भाव ऐक वेगळ्या परिभाषेत मला शास्त्रीय संगीत ऐकयला लागल्यानंतर कै वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या मारवा रागात मिळाला. वसंतराव यांच्या गायकीचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. सामान्य माणसाची कल्पना शक्ती बधिर होईल असे चकित करणारे अनुभूती वसंतराव गाताना देत. वसंतराव यांचा मारवा कधीच विसरला जाणार नाही!! मारवा गाताना लयीशी खेळ करत व्यक्त केलेला भाव तुम्हाला अंतर्मुख करतो !!
आमचे ऐक मित्र आहेत श्री प्रफुल्ल पेंढारकर यांच्याशी राग मारवा बद्दल गप्पा मारताना त्यांनी उस्ताद अमीर खान आणि पंडित जसराज यांच्या मारव्याचा उल्लेख केला. उस्ताद आमिरखान यांनी सदर केलेला मारवा ऐक विलक्षण आहे. अमीर खान यांच्या ठाय लयीत धीरगंभीर आवाजात मारवा रागाचे गंभीर रूप समजते!! उन्हाळ्यातील ऐका शांत संध्याकाळी तवसाळ किंवा वेळणेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी शांततेने सूर्यास्त बघावा तोच आनंद मला उस्ताद अमीरखान यांचा मारवा ऐकताना मिळाला
पंडित जसराज यांनी सादर केलेला आमिरखान यांच्या पठडीतला आहे पण उस्ताद अमीर खान यांची गायकीची उंची हि वेगळीच आहे!!
माझा मित्र श्री योगेश गोंधळेकर याच्याशी शास्त्रीय संगीताबद्दल वोलताना त्याने पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायकीचा उल्लेख केला होता आणि जेव्हा कशाळकरबुवा यांची काही सीडीज मी ऐकल्या पण ते ऐकल्यानंतर मला असे वाटले कि कशाळकरबुवा हे फार पुस्तकी (theoretical) आहेत पण २००६ साली सवाई गन्धर्वे महोत्सवात त्यांनी गायलेला मारवा आजही अंगावर काटा उभा करतो अगदी सूर्यास्ताची वेळ होती आणि कुठेही आक्रमक गायकी सादर न करता उल्हासजी जी गायकी गायली त्यातून मी दोन गोष्टींचा बोध घेतला ऐक योगेश योग्य माणसाची स्तुती करत होता आणि आक्रमक नसलेली गायकी पण फार उत्तम असते.
(ज्यांना सवाई मधील मारवा ऐकायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा)
आता मारवा आठवतो तो अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांनी फेब्रुवारी २०१५ साली सिंगापूर येथे गायलेला मारवा आठवतो कारण duet सादर करताना पहिले आवर्तन गायिले तेव्हा सगळा मारवा डोळ्यापुढे ऐका क्षणात उभा केला तो मारवा कायम लक्षात राहील. अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी आपल्या आजोबा आणि पणजोबा यांची परंपरा योग्य रीतीने पुढे नेत आहेत आणि आजच्या पिढीच्या गायकात पण घराणेदर गायकी कशी टिकून आहे याचे योग्य उदाहरण आहे
पंडित शिवकुमार शर्मा यांनी वाजवलेला मारवा म्हणजे ऐका शिखरावर सूर्यास्ताचे किरण पडल्यावर जसे दिसेल ते चित्र उभे करतो!!
पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी वाजवलेला मारवा म्हणजे बासरीच्या गोड मधाळ स्वर पण अंतर्मुख करू शकतात याचे उत्तम उदाहरण
पंडित रवी शंकर यांचा मारवा म्हणजे तंतुवाद्य घेऊन आर्त भाव कसा निर्माण होतो याचे उत्तम उदाहरण
उस्ताद विलायत खान यांचे वादन म्हणजे सतार कशी गाते आणि अंतर्मख करायला लावते याचे उत्तम उदाहरण
पण या सगळ्या वाद्यासंगीतावर कडी करणा मारवा आहे पंडित निखिल बनर्जी यांचा गायकी आणि तंत्कारी अंग यांचा सुयोग मिलाप म्हणजे पंडित निखिल यांचे वादन आहे
जेव्हा ऐका घराणेदार गायकाचा मारवा ऐकल्या नंतर आपण अंतर्मुख होतो तोच भाव मला समृद्धी पोरे दिग्दर्शित
Dr. Prakash Baba Amte: The Real Hero Full Movie हा चित्रपट बघितल्यानंतर तोच भाव मनात आला. हा चित्रपट पण राग मारवा प्रमाणे अंतर्मुख करणारा आहे. केलेचे मधयम जरी वेगळे असले तरी भाव तोच निर्माण करते
सरते शेवतो परत मावल्या दिनकराची आठवण सिंगापूर येथे डॉक्टर अनिता काळे यांनी एकदा ऐक घरगुती कार्यक्रमात मावळत्या दिनकरा ज्या पद्धतीने सादर केले त्यातील शब्दांची अनुभूती कायम लक्षात राहील
या आठवणी लिहिण्याची प्रेरणा माझी पत्नी सौ शलाका दामले हिने दिली आहे!!
मंडळी आठवण फार लांबली आहे पण कुठे काट छाट करावी असे न कळल्यामुळे जशी लिहिले तशीच ठेवत आहे