Thursday, December 31, 2015

मंगेश पाडगावकर 

परवा मंगेश पाडगावकर देवाघरी गेले!! कित्येकांनी आपल्या परीने आणि विचाराने श्रद्धांजली दिली आहे!! ते गेल्यानंतर मला कुठेतरी वाचलेली एक आठवण मी देत आहे. हि आठवण पाडगावकर जेव्हा काव्यक्षेत्रात तसे नवीन होते त्याकाळची आहे. आजच्या जमान्यातील नवोदित क्रिकेटपटूना जर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर कडून जर शाबासकी किंवा प्रोत्साहन मिळाले तर ते नक्कीच धन्य होतील!! जे आजचे स्थान क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर याचे आहे एच स्थान त्याकाळात तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचे होते!! पाडगावकर यांच्या काळातील कवींचे श्रद्धास्थान हे तात्यासाहेब होते!! तेव्हा त्याच्या पहिला कवितासंग्रह जिप्सी प्रसिद्ध झाला तेव्हा पाडगावकरांनी त्याची ऐक प्रत तात्यासाहेबांना पाठवली व अभिप्राय लिहिण्याची विनंती केली!! अभिप्रायाची प्रतीक्षा पाडगावकर करत होते सहा महिन्याच्या वर उलटून गेले आणि तात्यासाहेबांचा अभिप्राय काही आला नाही. आणखीन काही महिने गेल्यावर ऐक आंतरदेशीय पत्र त्यांना मिळाले त्यात तात्यासाहेबांचा अभिप्राय होता तो असा तुमचा कविता संग्रह मिळाला धन्यवाद!! कवितासंग्रःतील प्रत्येक कविता मी वाचून त्यावर विचार करत होता कविता करताना कवीची मानसिकता काय आहे त्यानुसार मी कवितेचा अर्थ लक्ष्य घेत होतो. सगळ्या कविता वाचल्यानंतर मी अश्या निर्णयावर येउन पोहोचलो आहे इतक्या सुंदर कविता लिहिणारा कवी असताना मी निवृत्ती घेतली तरी चालेल!! इतका चांगला अभिप्राय ऐक प्रतिभावंत दुसर्या प्रतिभावंताला क्वचितच देईल!!

माझे मित्र श्री चंद्रशेखर उर्फ तात्या अभ्यंकर यांच्या मतानुसार पाडगावकर असे प्रतिभावंत होते त्यांच्या देवाघरी जाण्याने आपण काय गमावलाय याची पूर्ण  जाणीव आज होणार नाही!! पुढील काही वर्ष जेव्हा आपण त्यांच्या कविता वाचनात येतीलकिंवा आपण त्यांनी लिहिलेली गाणी ऐकू तेव्हा आपण काय गमावलाय याची तीव्र जाणीव होईल!! मला तात्या अभ्यंकरांचा हा विचार पटला!! कारण आज जेव्हा कै ग दि माडगुळकर, कै शांता शेळके, कै आरती प्रभू, कै सुरेश भट वैगरे महान कवींच्या कविता वाचनात येतात किंवा त्यांची गाणी ऐकतो तेव्हा हे कवी आपल्यात नाहीत याची जेव्हा जाणीव मनात येते तेव्हा आपण काय गमावलाय याची जाणीव तीव्रतेने होते!! कै मंगेश पाडगावकर हे असेच कवी होते!! आणखीन काय लिहु ईश्वर मृताम्यास शांती देवो 

Sunday, December 20, 2015

पैन्ग्बरवासी उस्ताद बडे गुलाम आली खान 

पै उस्ताद बडे गुलाम अली खान ऐक वेगळेच रसायन होते!! मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती अशी नोंद आहे!!
मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमर्या गाऊन वेळ मारून नेत अशी पण नोंद आहे!!
कै जी ऐन जोशी ऐक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खांसाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले!! असे अवलिया कलाकार होते!!
अवलिया असल्याची आणखीन ऐक आठवण. त्यांचा उत्तर कर्नाटकात कोठे तरी ऐका छोट्या गावात मैफल ठरली!! संध्याकाळी मैफलीच्या ठिकाणी ते आणि त्यांचे साथीदार पोचले पण ती वेळ त्यांची नव्हती आणि मैफिलीत गाणे बिलकुल रंगले नाही साधारण रात्री १ वाजता त्यांनी रसिकांची माफी मागून मैफल आवरली आणि ते साथीदार आणि जमलेले रसिक रेल्वे स्टेशनात आहे जमलेले बहुतेक सर्व रसिक त्यांना निरोप देण्यास जमले होते. स्टेशनवर आल्या नंतर त्यांना गायची इच्छा झाली आणि गाडीची वेळ होई पर्यंत ते तेथील रसिकांना तेथेच गाणे ऐकवले!!
मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खांसाहेब जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गायला जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा त्यांना गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन सांगितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले!! जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला ) तो बहोत खुबसुरत है!!
एकदा देवधर मास्तर आणि खांसाहेब मुंबईत रस्त्यावर फिरत होते आणि तेव्हा त्या दोघांना ऐक नखरेल तरुणी दिसली तिच्याकडे बघून त्यांची तबियत एकदम खुश झाली आणि म्हणाले चल तुमच्या विद्यालयात चला तुम्हाला ऐक ठुमरी ऐकवतो आणि नंतर त्यांनी अशी काय रसिली ठुमरी ऐकवली कि त्याची आठवण आयुष्यभर राहावी अशी आठवण देवधर मास्तर लिहितात!! तसेच मुंबईत पावसाळ्यात marine drive येथे जसे पावसाचे पाणी ज्यावेगाने वर उसळी मारत होते त्याच वेगात ते मल्हार रागाच्या ताना घेत होते अशी आठवण पण देवधर मास्तर लिहितात
लाहोर येथे जन्मलेले खांसाहेब फाळणीनंतर तेथेच राहिले पण पाकिस्तानात जेवढा गझल गायकाला जेवढा मान मिळतो तेवढा मान शास्त्रीय आणि घराणेदार गायकाला मिळत नाही याची त्यांना खंत होती. काही वर्ष ६ महिने हिंदुस्थान आणि ६ महिने पाकिस्तानात राहत. त्यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कै मुरारजी देसाई यांना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. मुरारजी देसाई यांनी रसिकांवर मोठे उपकार केले आणि खांसाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले
ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता!! तसेच हरी ओम तत्सत सारखे भजन पण नेहेमी गात असत. आपण जेव्हा त्यांनी गायलेले हे भजन ऐकल तेव्हा धर्माच्या रेषा कश्या नाहीशा होतात याची अनुभूती होईल!!
गानसरस्वती लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या आणि १९५६ साली कोलकाता येथे ऐका संगीत समारंभात त्यांनी स्वरसाथ केली आहे आणि साथ करताना ऐक तान अशी काय घेतली कि खांसाहेबांनी तेथेच शाबासकी दिली अशी नोंद आहे!!
आंतरजाळावर त्यांची काही जुनी ध्वनीमुद्रणे वरचेवर येत आहेत हे रसिकांचे भाग्याच आहे!!
वरील ध्वनिफितीमध्ये १९५० च्या सुरुवातीला राग मारवा गायला आहे. आवाजाची प्रत (Sound Quality) फार उत्तम नाही आहे पण काय गात आहेत याची प्रचीती नक्कीच येते.
आणखीन काय लिहू!! मारवा ऐकताना ज्या वाचलेल्या आठवणी मनात येत गेल्या त्या येथे लिहिल्या आहेत!! या संगीत साधकास माझे दंडवत

राग बैरागी 

आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सकाळी गायचे अनेक सुंदर राग आहेत त्यात आहे राग बैरागी. काही लोक त्याला भैराव्चाच प्रकार मानतात. पण शास्त्रात न गुंतता आपण या रागाचा आस्वाद जरूर घेवूया!!
आजच्या युगातील आघाडीची गायक जोडी आहे पंडित राजन आणि साजन मिश्र ऐक सपक गायकीचे उत्तम उदाहरण!! त्यांनी गायलेला राग बैरागी अप्रतिम आहे
येथे उस्ताद आमिरखान यांनी गायलेली ऐक बंदिश त्यात उत्तम प्रकारे ईश्वराची आळवणी केली आहे!!

पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची मधुर बासरी 

उस्ताद बिस्मिल्लः खान यांच्या सनईच्या स्वरात ऐक वेगळा अविष्कार दिसतो

पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी कित्येक गाण्यांना आपल्या बासरीची जोड दिली आहे ये अभंगात जी दिली आहे ती कायम लक्षात राहील!! लाजबाब आहे. माउलींच्या शब्दांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेली पूरक चाल आणि जोडीला गानसरस्वतीचा स्वर ऐक नक्षत्रांचे देणे तयार झाले आहे!!

संत एकनाथ महाराजांच्या शब्दांना ऐक उत्तम चाल दिली आहे ती श्रीधर फडके यांनी. ऐक लाजबाब चाल आहे बरोबर सुरेश वाडकर यांची समर्थ गायकी मग काय ऐक महान कलाकृती निर्माण होणारच तसेच यात ज्यांनी सतार वाजवली आहे त्यात भक्तिरस ओथम्बुन वहात आहे असे वाटते!!

आशालता वाबगावकर या काही रागदारी शिकलेल्या गायिका नाहीत पण त्यांच्या गायकीला पेलेल अशी संगीत रचना अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकात दिली आहे. लावणीचा बाज असलेली रचनेचे शब्द आहेत कवी बालकवी यांचे

हिंदी चित्रपट गीतात माझ्या माहिती प्रमाणे ऐक गझल आहे ती येथे देत आहे 

कित्येक वर्षे मैफली ऐकलेल्या मित्रांना विनंती त्यांनी नक्कीच कोणाचा राग बैरागी मैफलीत ऐकला असेल त्यांनी त्या रागाची असलेली आठवण येथे जरूर लिहा!!

Saturday, December 19, 2015

राग बिलासखानी तोडी 

सकाळी ऐक्ण्याजोगा राग बिलासखानी तोडी. हा राग मिया तानसेन यांचे सुपुत्र बिलासखान याने निर्माण केला असे म्हटले जाते!! तानसेन आपल्या मुलाच्या गाण्यावर खुश नव्हता पण मुलाने जे निर्माण केले त्याला तोड नाही!! केवळ या रागामुळे बिलासखान यांची आठवण आजही उरली आहे!! राग भैरवीच्या जवळचा असा राग आहे!! अतिशय ग्रेसफुल असस राग आहे!! बर्याच गायकांनी गौण आणि वडकी वाजवून त्याला समृद्ध नाकी केले आहे!!
वरील चित्रफितीमध्ये विदुषी मालिनी राजूरकर यांनी हा राग अतिशय समर्थपणे सदर केला आहे साथीला आहेत मुकुंदराव काणे आणि पंडित गोविंदराव पटवर्धन!! मुकुंदराव काणे यांच्याविषयी एवढेच लिहीन अमेरिकेत राहून सुद्धा शिकलेली कला त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जोपासली आहे!! बाकी काही आणखीन जाणकार मंडळी यावर जास्त लिहितील!! मालिनीताई यांच्या गाण्याविषयी मी जास्त काही लिहिणार नाही फक्त एवढेच त्यांचे गाणे ऐक विलक्षण आहे!! आज गायिकांमध्ये विदुषी किशोरीताई यांचे नाव प्रथम येते किशोरीताई या निसंशय महान आहेत पण मालिनीताई माझ्या तेवढ्याच महान  गायिका आहेत पण एकच खंत आहे त्यांच्या गायाकीप्रमाणे त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही!! आजही वय असून तब्येतीच्या काही तक्रारी मध्ये ऐकल्या होत्या असे असूनही आजही मर्यादित स्वरुपात का होईना त्या आपले गाणे सादर करत आहेत हे रसिकांचे नक्कीच भाग्य आहे!! मला पुणेकर मंडळीचा हेवा वाटतो कारण मालिनीताई यांच्या मैफली नित्यनियमाने पुण्यात होत असतात!! त्यांना उदंड आयुष्य लाभी एवढीच पर्मेश्वर्चारणी प्रार्थना!!
जुन्या जमान्यातील गायिका आणि किरण घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची कन्या तसेच विदुषी हिराबाई बडोदेकर यांची भगिनी विदुषी सरस्वतीबाई राणे यांनी गायलेला हाच राग किराणा शैलीत गायला आहे!!
उस्ताद आली अकबर खान यांनी हाच राग ऐक वेगळ्या ढंगात सादर केला आहे!!
मरहूम उस्ताद विलायतखान यांची सतार गायची असे म्हणतात त्याच्या प्रत्यय येथे घ्या!!

कित्येक वर्षांपूर्वी कै दत्त डावजेकर यांनी सुखाची सावली याचीत्रापात या रागाचा फार सुंदर उपयोग केला आहे आणि हे गाणे त्याकाळी अतिशय गाजले

तसेच हिंदी चित्रपटात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ऐक याच रागात कायम लक्षात राहील असे गाणे दिले आहे

Raag Darbari - Few Glimpses

I am huge fan of late Pandit Pannalal Ghosh. Thanks to my close friend Sanjay Vyas who introduced Pandit Pannalal to me. I am equally huge fan of late Pandit Nikhil Bannerjee.
Raag Darbari - Pandit Pannalal

Raag Darbari - Pandit Nikhil 
Both artist have played the same raag but but see the difference between both instruments and presentation

ऐक विनोद किस्सा 

नमस्कार मंडळी सध्या गिरीश कुबेर लिखित टाटायान नावचे पुस्तक वाचत आहे त्या पुस्तकात समस्त तट मंडळींचा इतिहास आहे. तट समूहाचा देशाच्या जडण घडणीत कसा सिंहाचा वाटा होता. तसेच पुस्तकात एयर इंडिया कशी सरकारने पर्यायाने पंडित नेहरू यांनी दिवसा ढवळ्या दरोडा घालून चोरली याची समग्र कथा आहे!! याच पुस्तकात वाचलेला ऐक विनोदी किस्सा त्य्हेथे लिहित आहे.
श्रीमान रूसी मोदी हे १९३९ ते १९९३ पर्यंत टाटा स्टील कंपनीत कामाला होते हा माणूस कामाला फार उत्तम पण थोडा काही बाबतीत चक्रम असा होता आणि बरेच वर्ष कंपनीच्या उच्चपदावर पण होते!! आपल्या पैकी काही लोकांनी बॉम्बे हाउस नावाची मुंबईतील फोर्ट विभागात असलेली टाटा समूहाची मुख्य इमारत बघितली असेल आणि नसेल बघितली एकदा जरूर बघा हि विनंती. एकदा रूसी मोदी या इमारतीत कामाला आहे होते आणि इमारती बाहेरील रस्त्यावर आपली गाडी पार्क करत होता आणि त्याने क्गडी व्यवस्थित न पार्क केल्याने लगेच ऐक हवालदाराने हटकले आणि सांगितले गाडी नित लावा आणि मोदी हो म्हणाले आणि वासविक संभाषण येथेच थांबल्यला हवे पण मोदी त्यानंतर हवालदाराला काहीतरी अद्वातद्वा बोलले आणि राग येउन हवालदाराने विचारले रस्ता तेरे बाप क्या ही क्या? तेव्हा रूसी मोदी यांनी रस्त्याच्या फलकाकडे बोट दाखवत म्हणाले येह मेरे बाप काही नाम है कोई शक है क्या? रस्त्याचे नाव होते होमी मोदी स्ट्रीट आणि सर होमी मोदी रूसी मोदी यांचे खरोखरच वडील होते. तेव्हा हवालदार चाट पडला आणि खाली मान घालून निघून गेला!!

कट्यार चित्रपटातील गाणी 


कट्यारची गाणी दोन तीन वेळा ऐकून मी प्रतिक्रिया लिहित आहे
१. सूर निरागस गाणे ठीक आहे पण चाल पण ठीक आहे पण बुवांच्या चालीची सर नाही!!
२. भोला भंडारी चाल ठीक आहे पण गायकाची नवड चुकीची वाटली त्यामुळे गाणे पडले

३. दिन गेले भजनाविण कट्यार मधील गाणे कुठे भार्गमराव आचरेकर यांची दमदार गायकी आणि शंकरने गायलेले गाणे हे अगदीच आत्मा नसलेले वाटले!! 
४. शंकरने गायलेले घेई छंद मकरंद चांगले आहे
५. लागी करेजवा काटार हि ठुमरी अंगाचे गीत गाणारे आज समर्थ गायक असताना बुवांची ध्वनिमुद्रिका का वापरली हे कळत नाही!! आजच्या गायाकापैकी अभिषेकी बुवांचे कित्येक शिष्य हे गाणे नक्कीच बुवांचा आब ठेवून म्हणून शकले असते!!
६. मन मंदिरा गाणे ठीक आहे पण शंकर रेषांनी या शब्दाचा उच्चार करताना चुकला आहे!!
७. मुरलीधर श्याम परत तेच मुल प्रसाद सावकार यांचे गाणे कुठे आणि हे गायलेले पातळ आमटी सारखे वाटले!!
८. सुरे से सजी गाणे ठीक आहे
९. तेजोनिधी लोह गोल एकट्या राहुलने गायले असते जास्त चांगले असते कारण त्यातील जो आक्रमक गायकीचा अविष्कार शंकरच्या गायकीला विपरीत आहे!! परत वसुधेची लाज राख हि ओळ गाताना उच्चार काही व्यवस्थित झाले नाही!!
बाकी राहुलने गायलेली गाणी चांगली आहेत आपल्या आजोबांच्या गायकाची व्यवस्थित आब राखली आहे!!
मूळ नाटकातील माझे सर्वात आवडते गीत या भवनातील गीत पुराणे या चित्रपटात आहे असे वाटले नाही!!
शंकरची गाणी मर्यादित ठेवीन राहुलची वाढवली असती तर जास्त चांगला झाला असत असे मळता वाटते!! शेवटी कट्यार म्हणजे वसंतराव त्यांची जेवढी या नाटकावर छाप होती तेवढी अन्य गायक कलाकाराची नव्हती!!

तसेच नाकात गाणे हे शंकरच्या गाण्यातील मोठे वैगुण्य आहे ते येथे आड नाक्कीच्व्ह येत आहे!!
नाट्यसंगीत गाताना रस्व आणि दीर्घ याचे उच्चार वेगळे असतात असे वसंतराव म्हणत असत ती गोष्ट येथे काही फारशी जाणवली नाही!!

उत्तम प्रयत्न पण अपेक्षा वाढवून निराशा करणारा!!